मराठा आरक्षण नाही तो पर्यंत भुईंज गावात लोकप्रतिनिधींना प्रवेश बंदी
सकल मराठा समाजाच्या वतीने निर्णय
भुईंज : संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच त्याची ठिणगी वाई तालुक्यातील भुईंज गावात
पडली असून मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधींना गावात फिरकू न देण्याचा
निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला असून त्याबाबत वाईचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भालचिम यांना दिले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की आजपर्यंत जे जे सत्तेवर आले, त्यासर्वांनी राजकीय मराठा समाजाला हक्काच्या आरक्षणापासून झुलवत ठेवले. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी यांनी मराठा समाजातील लोकांचा फक्त मतासाठी वापर करून खोटी आश्वासने देऊन स्वतः मात्र मोठे झाले. झुलवत ठेवले.
आज मराठा समाजातील मुले मुली प्रचंड कष्ट घेऊन शिक्षण घेतात त्यांच्या प्रयत्नांना यश येईल आणि माझ्या मुलांना सरकारी नोकरी लागेल, अशी आशा पालक बाळगून असतात. मुलांना चांगले गुण तर मिळतातच पण इतर समाजातील मुलांना आरक्षणाचा फायदा मिळत असल्याने त्यांना कमी गुण मिळूनही सरकारी नोकरीत त्यांना प्रवेश सोपा होतो. आरक्षण नसल्याने मराठ्यांना नोकरी पासून वंचित रहावे लागत आहे. याची खंत मराठा समाजातील लोकांना आहे. यामुळे वाई तालुक्यातील भुईंज गावाच्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन इथून पुढे सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना गाव बंदीचा दणका दिला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला सरकारी आरक्षण देत नाही तोपर्यंत गावात लोकप्रतिनिधींनी प्रवेश करू नये, असा निर्णय गावातील सर्व युवकांनी व ग्रामस्थांनी घेतला आहे.
यांनी दिले वाई उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भालचिम यांना निवेदन
निवेदनावर मदन अर्जुन शिंदे, रविंद्र भोसले, किरण अशोक बाबर, दीपक सुर्यकांत शिंगटे, गजानन प्रतापराव भोसले. जितेंद्र भिकाजी वारागडे , शेखर मोहन भोसले, योगेश चंद्रकांत धस, श्री. गणेश धनंजय शिंदे, दीपक ज्ञानोबा शिवस, जितेंद्र प्रताप गायवाड, गणेश सुभाष बाबर, सोमनाथ मनोरंजन गायकवाड, अर्थव संजय गायकवाड आदीच्या सह्या आहेत.