breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

आमचे लोक अटक करण्यामागे सरकारचा कोणता डाव? मनोज जरांगे पाटीलांचा सवाल

Manoj Jarange Patil : जालन्यातील अंतरवली सराटी दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही अटक केली आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे लोक अटक करणार नाही असं आश्वासन सरकारने दिलं होतं तरीही जालन्यातून सरकारने आमच्या काही लोकांना अटक केली आहे. यामागे सरकारचा कोणता डाव आहे? असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आंतरवलीतले कार्यकर्ते अटक करणार नाही असं सरकारने सांगितलं होतं. मग आमचे लोक अटक करण्याचं कारण काय? आमचे लोक अटक करुन आम्हाला बदनाम करण्याचा डाव रचला आहे का? आमच्यावर अन्याय झाला आहे हे सांगून तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करणार नाही हे सरकारने सांगितलं होतं. मात्र आता आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जाते आहे. यामागे कोणता तरी डाव आहे हे उघड आहे.

हेही वाचा  –  बाळासाहेबांना ‘जनाब’ म्हटलं गेलं तेव्हा विश्वप्रवक्ते कुठे होते? शिंदे गटाचा संजय राऊतांना सवाल 

सगळ्या महाराष्ट्रातलेच कार्यकर्ते आमचे आहेत. समाजाला न्याय देण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे. अटक करण्याची भूमिका नव्हती तरीही अटक का केली गेली? मला या प्रकरणाची अधिकृत माहिती घेतली की बोलेन. आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

छगन भुजबळ यांनी आमच्या आरक्षणाला विरोध करायला सुरुवात केली आणि ते वाट्टेल ते आरोप करत आहेत. मग आम्ही उत्तर देणारच. आम्ही छगन भुजबळ यांना कुठलाही त्रास दिला नाही. त्यांनी बोलणं बंद केलं तर आम्हीही बोलणं बंद करतो, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button