राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा; भोगवटादार वर्ग 2 जमीनींवर तारण कर्ज मिळणार

मुंबई : राज्यातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांना आता बँकाकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. महसूल विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून राज्यभरातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या जमीनींवर तारण कर्ज मिळणार आहे.
याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले असून लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हा निर्णय कोणत्याही एका बँकेपुरता मर्यादित नसून राज्यातील कोणत्याही बँकेतून कर्ज मिळणं सोपे होणार आहे. यापूर्वी 1990 मध्ये भोगवटादार वर्ग दोनच्या जमीनींबाबत परिपत्रक काढण्यात आले होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. मात्र, एखादा शेतकरी कर्ज परतफेड करु शकला नाही. तर बँक अडचणीत येते. अशावेळी बँकेने त्याच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगावटा वर्ग 2 असेल तरी त्यावर बोजा चढविता येत नाही असे बँकांचे म्हणणे होते.
हेही वाचा – पुणे मनपाला डांबर पुरवठा न करताच हाती मिळतेय डिलिव्हरी पावती; करोडो रुपयांच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह ?
त्यामुळे भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी बँकेकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या. तसेच शेतकऱ्यांना कर्जही मिळत नव्हते. आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत. याबाबतचे स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.
सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी 11 मार्च रोजी भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनीबाबत बैठक घेऊन हा प्रश्न महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिला होता.
त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ एका बँकेपुरता मर्यादित न ठेवता राज्यातील सर्वच भोगवटादार वर्ग 2 खातेधारकांची अडचण लक्षात घेऊन त्यांना भोगावटादार वर्ग 2 च्या जमीनी बँकेला तारण घेता येणार आहे.
ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2. भोगवटा वर्ग दोनच्या जमिनींमध्ये, देवस्थानासाठी दिलेल्या इमानी जमीनी, हैद्राबाद अतियात जमिनी, वतन जमीन, वन जमीन, गायरान, पुन पुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. अशा जमीनी विक्री साठी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.