मुंबई विमानतळ उद्या ६ तास राहणार बंद; नेमकं कारण काय…? वाचा सविस्तर

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) उद्या गुरुवार( २० नोव्हेंबर २०२५) सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत पूर्णपणे ६ तासांसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत दोन्ही धावपट्ट्या (RWY०९/२७ आणि RWY १४/३२) बंद असतील आणि एकही विमान उडणार किंवा उतरणार नाही.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड ने ही बंदाची पूर्वनियोजित माहिती ६ महिन्यांपूर्वीच सर्व विमान कंपन्यांना दिली होती. हे बंद पावसाळ्यानंतरच्या नियमित देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी आहे. यात धावपट्टीची खोलवर साफसफाई, लाइटिंग सिस्टम तपासणी, ड्रेनेज सुधारणा आणि इतर सुरक्षा-संबंधित कामांचा समावेश आहे.
हेही वाचा – थंडीचा कडाका! पुण्यात विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, परभणीचे तापमान 7 अंशावर
प्रवाशांसाठी महत्त्वाचे : उद्या २० नोव्हेंबरला दुपारी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत मुंबईला येणारी किंवा मुंबईतून जाणारी बहुतांश विमाने रद्द किंवा वेळ बदलली जातील. इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा, स्पाइसजेट यासह सर्व प्रमुख विमान कंपन्यांनी प्रवाशांना SMS, ईमेल आणि अॅपद्वारे सूचना पाठवल्या आहेत. तरीही प्रवाशांनी आपली फ्लाइट स्टेटस विमान कंपनीच्या वेबसाइट किंवा CSMIA च्या अधिकृत वेबसाइटवर तपासावी. या बंदाची पूर्वसूचना (NOTAM) ऑक्टोबरमध्येच जारी झाली होती, त्यामुळे फ्लाइट शेड्यूलमध्ये मोठे बदल आधीच केले गेले आहेत.
दरम्यान, मुंबई विमानतळ दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अशी १-२ वेळा ५-६ तासांची देखभाल बंदाची घोषणा करतो. यंदा दुसऱ्या टप्प्यातील काम २० नोव्हेंबरला आहे. तुमची फ्लाइट उद्या असल्यास आत्ताच स्टेटस तपासा आणि गरज पडल्यास विमान कंपनीशी संपर्क साधा.





