Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हवामान खात्याने ‘या’ 13 जिल्ह्यांना दिला वादळी पावसाचा इशारा

मुंबई : देशावर युद्धाचं सावट असताना पावसाने राज्यातचं नाहीतर देशात थैमान घातले आहे. अनेक भागांमध्ये वादळाचं सावट पाहायसला मिळत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कोकण किनारपट्टी भागात ढगाळ वातावरणासह हवामान काहीसे दमट असणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना दिला वादळी पावसाचा इशारा ?

सातारा, पुणे, नाशिक, कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहनदेखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा –  एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; “सोशल मीडियावरुन खोट्या बातम्या पसरवल्यास…”

राज्यात एकाएकी गेल्या 48 तासांपासून पावसानं हजेरी लावल्यामुळं ऊन्हाची तीव्रता कमी झाली असून, तापमानातही सुखद घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. बहुतांश भागांमध्ये हवेत गारवा निर्माण झाला असून, राज्याच्या पश्चिम घाट परिसरामध्ये पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.

हा पाऊस मान्सूनपूर्व कि अवकाळी?

हवामानाच्या अंदाजांनुसार 13 मे च्या आसपास मान्सूनचे वारे अंदमान आणि निकोबार या ठिकाणी दाखल होतील. त्यानंतर ते पुढील प्रवास सुरू करतील. दरम्यान सध्या सुरु असणारा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस म्हणता येणार नाही असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button