पाचव्या दिवशी मनोज जरांगेंचं उपोषण सुरूच; मंत्र्याचा आश्वासनाचा फोन आल्याने औषधी द्रव घेतले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-7-780x470.jpg)
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणारे आंदोलक नेते मनोज जरंगे यांचे उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरूच राहिले. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील त्यांच्या मूळ अंतरवली सराटी गावात शनिवारी पासून उपोेषण सुरू केले आहे. आज त्यांना इंट्राव्हेनस फ्लुइड देण्यात आले.
मात्र आपल्या आंदोलनाविषयी निर्णय घेण्यास सरकार अयशस्वी ठरल्यास ते पुन्हा इंट्राव्हेनस फ्लुइड घेणे बंद करतील असा इशारा त्यांनी दिला. उपोेषणामुळे त्यांची ढासळलेली प्रकृती पाहता औरंगाबादचे (छत्रपती संभाजीनगर) शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांनी मंगळवारी अंतरवली सराटी येथे जाऊन जरंगे यांची भेट घेतली.
मराठा समाजातील सर्वांना सगेसोये म्हणून मान्यता देणाऱ्या मसुद्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची आणि कुणबींना मराठा म्हणून मान्यता देण्यासाठी कायदा करण्याची मागणी जरांगे करत आहेत. कुणबी हा कृषिप्रधान गट इतर मागासवर्गीय (ओबीसी) वर्गात मोडतो आणि जरांगे यांनी सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशी आग्रही मागणी केली आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन महाराष्ट्राच्या एका मंत्र्याने दिल्यानंतर मी आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास इंट्राव्हेनस फ्लुइड्स घेणे सुरू केले. पण जर सरकारने हा प्रश्न त्वरित सोडवला नाही, तर मी पुन्हा हे द्रव घेणे बंद करेन आणि मंत्र्याचे नाव उघड करेन असे ते म्हणाले.
हेही वाचा – भारतीय संघ पहिल्यांदाच अमेरिकेशी भिडणार; भारतीय वेळेनुसार किती वाजता सामना सुरु होणार?
आम्ही गेल्या १० वर्षांपासून आंदोलन करत आहोत आणि त्यांनी आमच्या संयमाची परीक्षा घेतली आहे, असे जरांगे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. सगेसोयरे अधिसूचना आणि मराठ्यांच्या कुणबी नोंदींसाठी हैदराबाद राजपत्र लागू करण्याच्या आमच्या मागण्यांचा मी वारंवार पुनरुच्चार करीत आहे.
आमची दुसरी मागणी म्हणजे गेल्या वर्षीच्या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, असे ते म्हणाले. जरांगे म्हणाले की त्यांनी संबंधीत मंत्र्याला इशारा दिला आहे की जर हा प्रश्न सोडवला गेला नाही तर या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणा-या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा जागांवर उमेदवार उभे करू.
आम्ही आरक्षण देणारे बनू, घेणारे नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. मराठा आरक्षणासाठी मी मरेपर्यंत लढणार आहे. मी १० महिने सरकारवर विश्वास ठेवला आहे, पण आम्हाला अजून न्याय मिळाला नाही. मंगळवारी झालेल्या बैठकीत खासदार भुमरे यांनी जरांगे यांना आश्वासन दिले की, मराठा आरक्षणाचा सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सरकार सक्रियपणे काम करत आहे.
मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी जरांगे यांचा रक्तदाब आणि साखरेची पातळी कमी होत असल्याने त्यांना अंतस्नायु द्रव आणि औषधांची गरज असल्याचे सांगितले.