Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करा, आम्हाला हिंदी शिकवू नका, गुजरातला शिकवा, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई :  महाराष्ट्रमध्ये मराठी भाषा सक्तीची करा असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी माय मराठीवर लक्ष दिले पाहिजे. मराठी भाषा कागदावर सक्तीची झाली असेल. जोपर्यंत मराठी भाषा सक्तीचे होत नाही तोपर्यंत मराठी भाषेला स्थान मिळणार नाही असे राऊत म्हणाले. मराठी विषयी भाजपाच्या लोकांना ठामपणे बोलताना पाहिलं आहे का? महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये या लोकांचं योगदान नाही, असे म्हणत राऊतांनी भाजपवर टीका केली. बेळगावत मराठी भाषेवर इतका अत्याचार होतं असताना भाजपच्या लोकांनी तोंड वर केलं आहे का? असा सवाल राऊतांनी केला.

हिंदीला वैधता नसली तरी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना इंग्रजी येत नाही म्हणून आमच्यावर हिंदी लादू नका असे राऊत म्हणाले. या महाराष्ट्रातून हिंदी सिनेमा, हिंदी गाणी, हिंदी साहित्य, नाटक यांचा उगम झाला आहे. जिथे हिंदी नाही तिथे सक्ती करु नका असे राऊत म्हणाले. देशात हिंदीविषयी आस्था व प्रेम आहे, संवाद भाषा आहे ती पण अभ्यासक्रमात सक्ती नको असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात सर्वात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची केली पाहिजे असे राऊत म्हणाले.

हेही वाचा –  कुदळवाडी कारवाईत मुस्लिम ‘टार्गेट’ की ‘सेल्फ गोल’ ?

कुठलातरी पक्ष हिंदीची मागणी करतो शिवाजी पार्कवर जाऊन नेत्यांशी चर्चा करतात. कुठल्यातरी सागर बंगल्यावरुन ते ट्विट तयार करुन आलं होतं इतकी तत्परता असू शकते असा टोला राऊतांनी राज ठाकरेंना लागवला. विद्यार्थ्यांवर ओझ लादू नका. आम्हाला हिंदी शिकवू नका, गुजरातला शिकवा असेही राऊत म्हणाले. कुठून तरी आलेला स्क्रिप्ट वाचू नका, तुम्ही कधी हिंदू झालात कधी हिंदू असतात कधी मराठी असतात काहीतरी ठरवा असेही राऊत म्हणाले. राज ठाकरे यांच्या निवेदनाबद्दल देखील राऊतांना विचारण्यात आलं, यावेळी राऊत म्हणाले की, हे देवेंद्र फडणवीस यांना सांगा त्यांच्या संगनमताने नाटक चालले आहे, त्यांना परत चहाला बोलवा असे राऊत म्हणाले. मराठीचा सन्मान या महाराष्ट्रात राहायला हवा, मराठी राजभाषा आहे तिच्या डोक्यावर राजमुकुटाचा हवा असे राऊत म्हणाले. फडणवीसांचे नेते घाटकोपरला गेले आणि त्या ठिकाणी बोलले की घाटकोपर ची भाषा गुजराती आहे त्यावर बोलला नाहीत तुम्ही. हा सगळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा डाव चालला आहे. फडणवीस यांना मराठी भाषा हिंदी भाषेविषयी प्रेम असल्याचे कारण नाही. बाळासाहेबांची भूमिका काय होती? एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत तुम्ही फडणवीस यांची भूमिका मान्य करत आहात का? असा सवालही राऊतांनी केला.

ओरिजनल शिवसेना विरोध करते आहे. देशाच्या राजधानीत हिंदीत बोलायचं हे आम्ही ठरवलं आहे. त्या लेवलला येण्यासाठी फडणवीसांना अभ्यास करावा लागेल असे राऊत म्हणाले. लोकसभा विधानसभेत त्यांनी हिंदू मुसलमान केलं, पालिकेमध्ये ते आता प्रांतवाद करणार राजकारणामध्ये काही सुपारीबाज लोक आहेत, ते असे सुपाऱ्या घ्यायचे प्रयत्न करतात. पण मराठी नागरिक सुज्ञ आहेत असे राऊत म्हणाले. सिंधुदुर्गात जो खून झालेला आहे त्यासंदर्भात अद्याप काही कारवाई झालेली नाही. बीड तर हातातून गेलेलाच आहे पण सिंधुदुर्गमध्ये दिवसाढवळ्यात जे कोण हत्या अपहरण सुरू आहे तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे असे राऊत म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button