१ मे पासून FASTag सिस्टीम होणार बंद! थेट जीपीएस वरून कापला जाईल टोल

FAS Tag | केंद्र सरकार 1 मे 2025 पासून फास्टॅगऐवजी नवीन उपग्रह-आधारित टोल संकलन प्रणाली सुरू करणार आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नवीन टोल धोरण पुढील 15 दिवसांत आणले जाईल आणि ते प्रवाशांसाठी समाधानकारक असेल. सरकार ज्या नवीन टोल सिस्टीमबद्दल बोलत आहे त्याला ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम म्हणतात.
ही एक जीपीएस-आधारित प्रणाली आहे, ज्यामध्ये उपग्रहाच्या मदतीने वाहनाचे स्थान ट्रॅक केले जाईल आणि त्या आधारावर, निश्चित अंतरानुसार टोल शुल्क थेट बँक खात्यातून कापले जाईल. याचा अर्थ असा की आता टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही.यामध्ये, वाहनाच्या ट्रॅक केलेल्या अंतरानुसार टोलची गणना केली जाते आणि थेट बँक खात्यातून पैसे दिले जातात.
हेही वाचा : To The Point | कुदळवाडी कारवाईत मुस्लिम ‘टार्गेट’ की ‘सेल्फ गोल’?
जर तुम्ही आधीच FASTag वापरकर्ता असाल तर घाबरून जाण्याची गरज नाही. या बदलामुळे, तुमचा टोल प्रवास पूर्वीपेक्षा सोपा, पारदर्शक आणि हायटेक होणार आहे.30 एप्रिल 2025 पर्यंत FASTag वापरणे सुरू ठेवा. यानंतर, तुमच्या वाहनात सरकार मान्यताप्राप्त जीपीएस उपकरण बसवा.
तुमचे बँक खाते या नवीन प्रणालीशी लिंक करा. एकदा सिस्टम पूर्णपणे कार्यरत झाली की, FASTag स्टिकर काढून टाका.तुम्हाला टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही. हा बदल भारतातील महामार्ग व्यवस्थेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा मानला जात आहे. ही प्रणाली खाजगी कार मालकांपासून ते ट्रक आणि वाहतूक क्षेत्रापर्यंत सर्वांसाठी सोयीस्कर ठरू शकते.