#Lockdown | देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 हजार पार
नवी दिल्ली | कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण देश हतबल झाला आहे. लॉकडाऊन असूनही कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 8447 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 7409 कोरोना बाधित आहेत. तर 764 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील 24 तासात कोरोनाबाबत समोर आलेली सर्व माहिती पत्रकार परिषदेत सादर केली. गेल्या 24 तासात देशभरात 34 रुग्णांचा बळी कोरोनाने घेतलाय. कोरोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि 8356 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर जगभरात एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित संक्रमित रुग्णांची जगातील संख्या 16लाखांहून अधिक आहे. चीन, इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये कोरोनाचा सर्वाधित प्रभाव आहे.