breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Lockdown: कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा होणारच: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. रविवारी दहावीचा भूगोलाचा पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी घेतला होता. त्यानंतर विद्यापीठांच्या इतर परीक्षा रद्द झाल्या, अशाप्रकारचं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर उदय सामंत यांनी या परीक्षा रद्द होणार नसल्याची माहिती दिली.