breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यापालांची भेट

मुंबई – सध्या राज्यात भष्ट्राचाराच्या मुद्यावरून राजकारण तापलं आहे. त्यातच विरोधीपक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच सरकारवर ‘डेटा बाॅम्ब’ फोडला. तर दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. या सर्व मुद्यांवरून भाजप नेत्यांनी काल राजभवन गाठलं होतं. तर आता महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे.

महाविकास आघाडीतील नेते आज राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. महाविकास आघाडीवर करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता हे नेते राज्यापालांसमोर मांडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

वाचा:-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,64,881 वर

राज्यात वाढणाऱ्या खंडणी प्रकरणावरून आणि वाढत्या भ्रष्ट्राचाराच्या मुद्यावरून मुख्यमंत्री मौन बाळगून आहेत. त्यामुळे काल भाजपचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते बुधवारी राजभवनावर गेले होते. सत्ताधारी आघाडीने नैतिकता पायदळी तुडवतली आहे. तर मुख्यमंत्री डोळे झाकून ‘नरो वा कुंजरो’ भूमिका घेत आहेत, असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांच्या राजभवनाच्या दौऱ्यानंतर महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत, आपलं स्पष्टीकरण राज्यपालांकडे मांडणार आहे. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजभवनाचे महत्व वाढताना दिसत आहे. राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख असले तरी राजकारणात त्यांचा कल वेळोवेळी वाढताना दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button