Breaking-newsताज्या घडामोडी

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना अडचणीत?, आमदार रवी राणांचा मोठा दावा

अमरावती : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अपक्ष आमदारांच्या बळावर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, राज्यातील अपक्ष आमदार भाजपच्या पाठीशी असल्याचा दावा बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी गुरुवारी केला.

‘राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार विजयी होणार आहेत. अपक्ष आमदार मुख्यमंत्र्यांना भेटत असले तरी ते मनाने भाजपच्या सोबत आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत कितीही धोडेबाजार झाला तरी अपक्षांची मते भाजपलाच मिळतील,’ असे राणा यांनी सांगितले.

‘अमरावतीत बियाण्यांचा तुटवडा’

‘खरीप हंगामासाठी शेतकरी पेरणीच्या तयारीत असताना अमरावती जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्यांचा प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जिल्ह्यात पेरणीच्या हंगामात महाबीजचे ५० ते ६० हजार टन बियाणे येत होते. परंतु, आता अमरावती जिल्ह्यात केवळ अडीच हजार टन बियाणे उपलब्ध आहेत. यातून महाबीज कंपनीचे खच्चीकरण केले जात आहे,’ असा आरोप राणा यांनी केला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button