अकोला जिल्ह्यातील जम्मू-काश्मीरमधून श्रीनगरसह परतलेले ३१ पर्यटक सुखरुप
दुर्दैवी घटनेचा आघात असूनही प्रवाशांच्या डोळ्यात आनंदाश्रू

अकोला : जिल्ह्यातून जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे गेलेले ३१ पर्यटक शनिवारी (ता. २६) सुखरुप दाखल झाले. जिल्ह्यातील प्रवासी सुखरूप परत आल्यानंतर पर्यटकांचे हुतात्मा स्मारक येथे पुष्पगुच्छ देऊन राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी स्वागत केले. यावेळी नातेवाईक, परिचित व पर्यटकांनी एकमेकांची गळाभेट घेतली. जिल्ह्यात परतल्यानंतर प्रवाशांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते तर पहलगाममध्ये झालेल्या घटनेचे दुख सुद्धा होते.
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला. हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील काही प्रवासी एका टूर्स व ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून काश्मीर येथे गेले हाेते. सदर टूर्स व ट्रॅव्हल्सचे संचालक यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती प्राप्त झाली हाेती. सदर माहिती राज्य नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली.
हेही वाचा – तुमच्या वडिलांचे प्राण वाचवणाऱ्या एकनाथ शिंदेंबाबत बोलणे संस्कारात बसते का? रोहिणी खडसेंवर शिवसेनेचा पलटवार
सर्व सुखरूप असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर सर्वांना श्रीनगर येथून मुंबईत विशेष विमानाने आणण्यात आले. मुंबई येथून सर्व प्रवासी शुक्रवारी रात्री खासगी बसने अकोला येथे येण्यासाठी निघाले व शनिवारी दुपारी अकाेल्यात पाेहाेचले. नेहरू पार्क जवळील हुत्मात्मा स्मारक येथे त्यांना आणण्यात आले. याठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यात भाजपचे आमदार रणधीर सावरकर, माजी महापाैर विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष जयंत मसने, मनाेज शाहु, पवन महल्ले आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमाेद देंवडे, मिलींद इंगळे, गजानन गवई उपस्थित होते.
ढगफुटी झाली व पहलगामला जाणे टळले
प्रवाशांना जम्मू-काश्मीरला घेवून जाणारे ट्रॅव्हल्सचे पंकज साहू आणि अंबादास सप्रे यांनी सांगितले की सर्वच प्रवाशी १९ एप्रिल रोजी जन्मू व काश्मीर येथे दाखल झाले. सर्वांना प्रथम पहलगामला जायचे होते. मात्र ढगफुटी सदृश्य स्थितीमुळे जन्मूचा रस्ता बंद झाला. त्यामुळे आम्ही कटरा येथे पोहोचलो.