Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जनतेला दिल्या विजय दिनाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली |
भारताच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस आहे. या युद्धात ज्या जवानांनी आपल्या प्राणांची आहुती त्या शहीदांना देखील श्रद्धांजली दिलेली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून सर्वांना विजय दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.
भारतीय सेनेने 1971 मध्ये आजच्याच दिवशी ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. त्यांच्या साहसाची आणि पराक्रमाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अशा या महान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असे अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलेले आहे.
वाचा- मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे





