चित्रपट हिट होत नसल्याने राजकारणात प्रवेश? कंगना म्हणाली..
Kangana Ranaut | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची पाचवी यादी जाहीर झाली आहे. या यादीत अभिनेत्री कंगनाला लोकसभेचं तिकिट देण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून कंगना रणौत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहे. कंगनाने तिचे चित्रपट हिट होत नसल्याने राजकारणात प्रवेश केला असल्याचं बोललं जात आहे. यावरून तिने स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.
चित्रपट हिट होत नसल्याने राजकारणात प्रवेश? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाले की, या जगात असा एकही अभिनेता नाही ज्याचे चित्रपट कधीच फ्लॉप झाले नसतील. शाहरुखने १० वर्षात एकही हिट दिला नव्हता, मग त्याचा ‘पठाण’ सिनेमा आला. माझे सिनेमे ७-८ वर्षे चालले नाही, नंतर ‘क्वीन’ हिट झाला. मग पुन्हा ३-४ वर्षे सिनेमे हिट झाले नाहीत आणि ‘मणिकर्णिका’ हिट झाला. आता ‘इमर्जेन्सी’ चित्रपट येत आहे, मला आशा आहे की तो चालेल.
हेही वाचा – ‘नीट राज्यकारभार केला नाही तर राजालाही पायउतार व्हावं लागतं’; मोहन भागवत यांचं सूचक विधान
आजकाल ओटीटीमुळे कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याच्या अधिक संधी आहेत. स्टार्सची आमची शेवटची पिढी आहे. ओटीटीमध्ये कोणतेही स्टार्स नाही. आम्ही लोकांच्या ओळखीचे चेहरे आहोत आणि आम्हाला खूप मागणी आहे, पण ओटीटीचं असं नाही, असं कंगना म्हणाली.
दरम्यान, कंगना रणौतचा ‘इमर्जेन्सी’ चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे आणि मिलिंद सोमण यांच्याही भूमिका आहेत.