breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“अंधश्रद्धा कायदा हिंदू विरोधात आहे असे म्हणणे योग्य नाही”; जयंत पाटील

अंधश्रद्धेमुळे काही लोकांची दुकाने बंद होणार असतील, तर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करावा

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अतिशय विचारपूर्वक व बराच अभ्यास करून विधिमंडळात पारीत करण्यात आला. त्यावेळी सगळ्यांचाच विचार करण्यात आला होता. त्यामुळे अंधश्रद्धा कायदा हिंदू विरोधात आहे असे म्हणणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिली.

अंधश्रद्धेमुळे काही लोकांची दुकाने बंद होणार असतील, तर मला वाटत नाही की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्दच करावा. अंधश्रद्धा कायदा हिंदूंच्या विरोधात नाही. तो सर्व धर्मात असलेल्या अंधश्रद्धांच्या विरोधात आहे, असेही जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दीपक केसरकरांना शिवसेना व उद्धव ठाकरे यांनी मोठी संधी दिली होती. आता राष्ट्रवादीने शिवसेना फोडली की दीपक केसरकर आणि त्यांच्या कंपूने शिवसेना सोडली हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. चोराच्या उलट्या बोंबा, अशा ज्या म्हणी आहेत ना त्या म्हणींचा अभ्यास दीपक केसरकर यांनी करायला पाहिजे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button