breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘मी पुन्हा येईन’ या विधानावरून जयंत पाटलांचा खोचक टोला

मुंबई : मी पुन्हा येईन असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केल्याने या वक्तव्याची भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असली पाहीजे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. फडणवीस सध्या दुसऱ्या क्रमांकावर बसलेले आहेत ते शिंदेंना बाजूला ढकलून मुख्यमंत्री पदावर बसत असतील तर त्याची चिंता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या चाळीस वीरांनी करावी, असं जयंत पाटील म्हणाले.

राज्यात होणाऱ्या कोणत्याही चांगल्या कामाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध नाही. केंद्र सरकारने कामगार कायदे बदलले आहेत त्यामुळे तीनशेहून कमी कारगार असलेल्या ठिकाणी कामगारांना कोणतेही संरक्षण नाही. यातून कामगारांचे शोषण होत आहे. त्याप्रमाणेच बारसू येथील कामगारांचे, तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये, तसेच तिथल्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याचा विश्वास सरकारने लोकांमध्ये निर्माण करावा, अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. यासाठीच आज उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे भेट दिली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

तसेच या प्रकल्पातून पर्यावरणाची हानी होणार नाही असा विश्वास स्थानिकांना झाल्यास स्थानिक लोकच प्रकल्पाला मान्यता देतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. स्थानिक लोकांचे समाधान करण्याचे तारतम्य सरकारने बाळगले पाहीजे. नाणार येथेही लोकांना विश्वासात घेऊन काम करणे आवश्यक होते ते कदाचित झाले नसावे. लोकांची समजूत घालणे, त्यांना विश्वासात घेणे हे कोणत्याही विकासमार्गाचे पहिले पाऊल आहे. ते जर सरकार टाळून रेटारेटी करत असेल तर अनेक प्रश्न तयार होतात. यातून स्थानिकांना हा प्रकल्प आपल्या विरोधी असल्याचे वाटतं, असंही जयंत पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button