ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

सातारा: विधानधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा  मुद्दा गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्यपाल नियुक्त जागांवर महाविकास आघाडीच्या वतीने नावे पाठवण्यात अली होती गेल्या सहा महिन्यांपासून हा मुद्दा राज्यपालांकडे प्रलबित असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. पण राजभवनाकडे याबाबत माहिती अधिकार कायदा अंतर्गत माहिती मागितली असता राजभवनने याबाबत वेगळेच उत्तर दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही, अशी माहिती राजभवनाच्या वतीने सांगण्यात आली आहे. पुन्हा एकदा जयंत पाटलांनी विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्य सरकारने मा. राज्यपालांना आठवण करून दिली आहे.

नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी केला आहे. सातारा येथे पत्रकारांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत प्रश्न केला असता जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

देशात आणि राज्यात आमदारांच्या नियुक्त्या रखडवून ठेवण्याचा अशाप्रकारचा अनुभव कधी आला नव्हता. राज्य सरकारने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पाठवल्या आहेत. राज्य सरकारने शिफारस केल्यानंतर, इतक्या काळानंतरही प्रलंबित नियुक्त्यांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यपालांनी निर्णय न घेतल्यामुळे राज्य सरकारच्या शिफारशी करण्याच्या अधिकारावर गदा येतेय का? हा खरा प्रश्न असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button