IPL2021 : दिल्ली की कोलकाता, कोण मारणार बाजी?
दुबई – आयपीएल 2021च्या दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहेत. शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवण्यात येईल. आज कोणता संघ अंतिम फेरीत धडक देऊन चेन्नईला समोरे जाणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कर्णधार एमएस धोनीच्या अनुभवाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने आधीच आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. तर आज आयपीएल 2014 प्रमाणे कोलकाता संघ पुन्हा एकदा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतात खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खराब कामगिरीनंतर कोलकाताच्या संघाने दुसऱ्या टप्प्यात कर्णधार इयोन मॉर्गनच्या नेतृत्त्वात उत्तम खेळी करत वापसी केली. मात्र कोलकातासमोर दिल्लीचे तगडे आव्हान आहे. कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या दिल्लीच्या संघाने पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात अव्वल स्थान पटकावले होते. अशातच आज दिल्ली किताबावर नाव पटकावण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तसेच कोलकाता आपल्या तिसऱ्या आयपीएल किताबावर नाव कोरण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची शक्यता आहे.
कोलकाता आणि दिल्लीचा संघ आयपीएलमध्ये 28 वेळा एकमेकांविरोधात खेळले आहेत. त्यापैकी कोलकाताने 15 वेळा बाजी मारली आहे, तर दिल्लीच्या संघाने 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमध्ये आजच्या सामन्यात जिंकू किंवा मरू अशी स्थिती पाहायला मिळणार आहे.