breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘इंडिया’ची पुढची रणनीती मुंबईतल्या बैठकीत ठरली? मल्लिकार्जुन खरगे म्हणाले..

मुंबई : ‘इंडिया’च्या आघाडीची मुंबईत आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘इंडिया’च्या आघाडीची पुढची रणनीती सांगितली. तसेच केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, पंतप्रधानांनी एलपीजीच्या किंमतीत २०० रुपये कमी केले. परंतु, ते करण्याआधी त्यांनी गॅसची किंमत अनेक पटींनी वाढवली होती. मोदीजी आधी १०० रुपये वाढवतात आणि मग २ रुपये कमी करतात. एलपीजी आणि पेट्रोलच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. एलपीजीची किंमत २०० रुपयांनी कमी केली, परंतु, ७०० रुपये अद्याप बाकी आहेत. वस्तूंच्या किंमती आधी मोठ्या प्रमाणात वाढवतात आणि मग त्यात थोडीशी घट करतात. याद्वारे मोदी सरकारने लाखो रुपये कमावले, गोरगरिबांचा खिसा कापला. गरिबांचं शोषण हीच त्यांची रणनीति आहे. परंतु, आता तसं होणार नाही. इंडिया आघाडी ही परिस्थिती बदलेल.

हेही वाचा – INDvsPAK : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना कोण जिंकणार? कुठे पाहता येणार, प्लेईंग ११, वाचा सविस्तर..

‘इंडिया’च्या बैठकीत मांडलेले ठराव : 

  1. इंडिया आघाडीतले सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणूक आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका एकत्र लढतील. सर्व पक्षांनी तसा संकल्प केला आहे. निवडणुकांसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया ताबडतोब सुरू केली जाईल आणि लवकरच पूर्ण केली जाईल.
  2. इंडिया आघाडीतले सर्व पक्ष मिळून देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकत्रितपणे सार्वजनिक सभा घेणार आहेत.
  3. इंडियामधील पक्ष विविध भाषांमधून ‘जुडेगा भारत, जीतेगा भारत’ या इंडियाच्या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करतील.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button