breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

INDvsAUS 1st Test : भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला धोपटलं! रोहित शर्माचे दमदार शतक

रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलचे अर्धशतक!

INDvsAUS : भारताने आज बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील सुरू असणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाखेर 7 बाद 321 धावा केल्या असून 56 धावांवर नाबाद असलेल्या रोहित शर्माने आज आपले शतक पूर्ण केले. यामुळे भारताकडे सध्या 144 धावांची आघाडी आहे.

भारतीय फलंदाजांनी कसोटीतील दुसऱ्या दिवशी चमकदार कामगिरी केली. सलामीला आलेल्या रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार शतक ठोकलं आहे. रोहितने 212 चेंडूंचा सामना करत 120 धावा केल्या असून त्याने या शतकी खेळीमध्ये 2 षटकार आणि 15 चौकार मारले आहेत.

तसेच भारतीय फलंदाजांची वरील फळी कमकुवत ठरल्यानंतर रोहित शर्मानंतर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी मैदानावर आकर्षक खेळ करत आपले अर्धशतक पूर्ण केले. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रविंद्र जडेजा 66 धावांवर आणि अक्षर पटेल 52 धावांवर नाबाद आहेत.

दरम्यान काल पहिल्या दिवशी केएल राहुल 20 धावांवर बाद झाला. तर आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अश्विन 23, पुजारा 7, कोहली 12, सुर्यकुमार यादव 8 धावांवर झटपट बाद झाले. तर ऑस्ट्रेलियाच्या मर्फीने आकर्षक गोलंदाजी करत 82 धावा देऊन सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या तर लायन आणि कमिन्सने प्रत्येकी 1 विकेट घेतली. दरम्यान ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण आज कमकुवत दिसले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button