आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई

दिवसातून किती वेळा नाश्ता आणि जेवण करणे गरजेचे?

दिवसभरात काय खाणे गरजेचे आहे हे तज्ञांकडून जाणून घ्या

मुंबई : भारत हा असा देश आहे जिथे परदेशी पर्यटकांना ही इथले जेवण आवडते. परंतु भारतीय संस्कृतीत सामान्यतः ब्रंच अधिक लोकप्रिय आहे. येथे लोक सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान नाश्ता करून कामावर जातात. इतकच नाही तर अनेक वेळा लोक नाश्ता सोडून देतात ही एक वाईट सवय आहे. याशिवाय भारतीयांना दिवसभरात अनेक कप चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे आणि हे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे.यामुळे भारतीयांनी एका दिवसात किती वेळा जेवण करावे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याबाबत आहार तज्ञ मेधवी गौतम यांनी सांगितले की भारतीयांना दिवसभर फक्त जेवण करण्याची सवय असते आणि त्यानंतर फ्कत ते चहा किंवा कॉफी घेतात. परंतु हे करणे योग्य नाही.

नाश्ता पूर्ण असावा आहार तज्ञ मेधवी गौतम सांगतात की सामान्यतः भारतीयांनी दिवसभरात तीन वेळा जेवण आणि दोन वेळा नाश्ता केला पाहिजे. मेधवी पुढे सांगतात की सकाळचा नाश्ता जड आणि पोटभर असावा कारण यानेच आपला दिवस सुरू होतो. सकाळची सुरुवात उत्साही करण्यासाठी नाश्ता पौष्टिक असणे महत्त्वाचे आहे. याशिवाय दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण चूकवण्याची गरज अजिबात नाही. तसेच तुम्ही चहा सोबत काही आरोग्यदायी पदार्थ खाऊ शकता.

हेही वाचा  :  ‘विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात सन्नाटा पसरला’; राज ठाकरेंकडून शंका उपस्थित

मेधवी आणि जेवणाची योग्य वेळ कोणती? मेधवी यांच्यामध्ये तुम्ही सकाळी आठ ते नऊ या वेळेत नाश्ता केला पाहिजे. तर दुपारचे जेवण एक ते दोन या वेळेत करणे अपेक्षित आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सकाळच्या नाश्त्यासोबत चहा किंवा कॉफी घेऊ शकता पण हे लक्षात ठेवा की तुम्ही नाश्त्यांमध्ये फक्त आरोग्यदायी पदार्थ खाल्ले पाहिजे. याशिवाय संध्याकाळी छोटी भूक भागवण्यासाठी तुम्ही चहा किंवा कॉफी सोबत मुरमुऱ्याचा चिवडा किंवा भेळ तसेच काही आरोग्यदायी स्नॅक्स खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संध्याकाळी स्मुदीचे सेवन करू शकता. यानंतर रात्रीच्या जेवणात हलके अन्न घ्या.

आहार तज्ञ मेधवी गौतम यांनी सांगितले की तुम्ही नेहमी रात्रीचे जेवण हलके करा. खरे तर बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर कोणतीही शारीरिक क्रिया करत नाहीत त्यामुळे अन्न पचनास वेळ लागतो म्हणून तुम्हाला अपचन किंवा ऍसिडिटी ची समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही रात्रीचे जेवण रात्री आठ वाजेपर्यंत करा आणि तेही हलके करा. जेणेकरून तुमच्या पोटालाही आराम मिळेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button