breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आम्ही महापालिका निवडणुकांसाठी कधीही तयार’; एकनाथ शिंदे

ज्यावेळेस सत्तेत आलो तेव्हा निवडणूका डोळ्यासमोर होत्या का?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंदर्भात सुनावणी सुरू आहे. महानगरपालिका क्षेत्रांमध्ये अनेक इच्छूक उमेदवारांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणूकीवरून भाष्य केलं आहे.

शिंदे आणि फडणवीस सरकारकडून महानगरपालिकेच्या निवडणुका टाळण्यात येत आहेत, असा आरोप विरोधांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यावर बोलताना निवडणुकीची केस न्यायालयात प्रलंबीत आहे. आमच्या हातात काहीच नाही. मात्र, महापालिका निवडणुकांसाठी आम्ही कधीही तयार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

काही लोक सर्वोच्च न्यायालयाला सल्ले देतात. अगोदर उच्च न्यायालयाला सल्ले देत होते. आम्ही चार पाच महिन्यांमध्ये एवढी काम करू शकतो. जर आम्हाला संधी दिली तर काय करू शकतील हे लोकांना कळून चुकलं आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, न्यायव्यवस्थेवर आमचा पुर्ण विश्वास आहे. आपलं सरकार कायद्याद्वारे स्थापित झालेलं आहे. आमच्याकडे 50 आमदार आणि 13 खासदार आहेत. आम्ही ज्यावेळेस सत्तेत आलो तेव्हा निवडणूका डोळ्यासमोर होत्या का?, असा प्रश्न उपस्थित करत लोक ठरवतात की, कोण कामाचा आणि कोण बिनकामाचा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. आम्ही निवडणूका डोळ्यासमोर ठेवत नाही. कधीही निवडणुका घेण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवल आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button