धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान; म्हणाले..
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले होते. मात्र, सरकारच्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घतले आहे. दरम्यान, यावरून बागेश्वर धामचे अध्यात्मिक गुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कारण, जेव्हा देश गुलामगीरीत होता, तेव्हा शौर्याने स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम मराठा समाजानं केलं. सरकारनं मराठा समाजाशी चर्चा करून आरक्षण दिलं पाहिजे. बागेश्वर पीठ मराठा समाजाबरोबर आहे.
हेही वाचा – स्वत:च्या ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओवर रश्मिका मंदानाने सोडले मौन; म्हणाली..
दरम्यान, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अयोध्यानगरी येथे ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान कार्यक्रम पार पडणार आहे. अयोध्यानगरीच्या ५६ एकर मैदानावर सुमावरे ४० एकरांवर रामकथेसाठी मंडप टाकण्यात आला आहे.