तिरुपती मंदिरात दर्शनासाठी भाविक तब्बल ६ तास रांगेत
तिरुपती | टीम ऑनलाइन
आंध्र प्रदेशातील तिरुमला येथे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी काल गुरुवारी तिथल्या असुविधेबद्दल घोषणाबाजी करत निषेध केला. कारण भाविकांना सहा तास रांगेत थांबावे लागत असून त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे घोषणाबाजी करणाऱ्या भाविकांना पोलिसांनी मंदिर परिसरातून हुसकावून लावले.
थिरुमला श्रीवरी मंदिराच्या प्रवेशद्वारावर दर्शनासाठी थांबलेल्या भाविकांनी चिंता व्यक्त केली. स्वामींचे दर्शन खूप उशिरा होत आहे. येथे स्वयंपाकाच्या अनेक समस्या असून भाविकांसाठी अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात नसल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. लहान मुले असो वा वृद्ध त्यांच्या त्रासाची दखल घेतली जात नसल्याने भाविकांचा संताप दिसून आला. मात्र घोषणाबाजी करणाऱ्या भाविकांना पोलिसांनी दमदाटी करून मंदिर परिसराबाहेर काढले. यावेळी भाविक व पोलिसांमध्ये शाब्दिक वाद पाहावयास मिळाला. पोलिसांनी अनुचित वर्तन केल्याची माहिती भाविकांनी यावेळी दिली.