breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
भारतीय सैन्यानेच LAC ओलांडुन गोळीबार केला, चीन परराष्ट्र मंंत्रालयाचा आरोप अजुनही ठाम
नवी दिल्ली: 7 सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने बेकायदेशीरपणे LAC ओलांडली आणि पांगोंग त्सोच्या दक्षिण किनार्यात प्रवेश केला होता. आमचे सैन्य चर्चेसाठी तेथे होते मात्र भारतीय सैनिकांवर इशारे देत गोळीबार केला आहे. अखेरीस आमच्या सैन्याने परिस्थिती स्थिर करण्यासाठी उपाययोजना केल्या अशी प्रतिक्रिया चीन परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली आहे. काही वेळापुर्वी भारतीय सैन्याने हे आरोप फेटाळुन लावलेले होते.