breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांच्या ‘त्या’ भाकितावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

पुणे |

पुढील काही दिवसांमध्ये केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या ठिकाणी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या निकालांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाकित वर्तवत भाजपचा पराभव होईल असे म्हटले होते. शरद पवारांच्या या भाकितावर आता भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी असं भाकीत अनेक नेते करत होते की, भाजपाला केवळ 180 जागा मिळतील.

पण अगोदरपेक्षा जास्त जागा भाजपाला मिळाल्या, या निवडणुकांमध्येही भाजपा हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून आपल्या समोर येईल, असा विश्वास व्यक्त करत फडणवीसांनी पवारांना टोला लगावलेला आहे. दरम्यान, पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल. केवळ आसाममध्ये भाजपाची सत्ता राहील, असा असा अंदाज शरद पवारांनी व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजपा सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे, असेही पवार म्हणाले होते.

वाचा- ‘कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरेंनी राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली’,- चंद्रकांत पाटील

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button