धक्कादायक! महाराष्ट्रात सात महिन्यांत १,५५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मुंबई : पावसाअभावी राज्यातल्या अनेक भागांमधील पिकांचं नुकसान झालं आहे. यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये महाराष्ट्रात तब्बल १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्यांची विभागनिहाय आकडेवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये म्हटलं की, राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलैपर्यंत तब्बल १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अमरावतील विभागात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या विभागात गेल्या ७ महिन्यांमध्ये तब्बल ६३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
अमरावती विभागात ६३७ शेतकरी आत्महत्या
अमरवती १८३
बुलढाणा १७३
यवतमाळ १४९
अकोला ९४
वाशीम ३८
औरंगाबाद विभागात ५८४ शेतकरी आत्महत्या
बीड १५५
उस्मानाबाद १०२
नांदेड ९९
औरंगाबाद ८६
परभणी ५१
जालना ३६
लातूर ३५
हिंगोली २०
हेही वाचा – भारत आणि कॅनडातील तणाव आणखी वाढला; कॅनडातील लोकांना भारतात येण्यावर बंदी
ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय!
राज्यात 1 जानेवारी ते 31 जुलै पर्यंत तब्बल 1555 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
*अमरावती विभागात सगळ्यात जास्त आत्महत्या*
*अमरावती विभागात 637 शेतकऱ्यांच्या आत्महत्या*
*अमरावती विभाग*
अमरावती विभागात 637 शेतकरी आत्महत्याअमरवती 183… pic.twitter.com/MX2bXKQXfL
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 21, 2023
नागपूर विभागात १४४ शेतकरी आत्महत्या
चंद्रपूर ७३
वर्धा ५०
नागपूर १३
भंडारा ०५
गोंदिया ०३
नाशिक विभागात १७४ शेतकरी आत्महत्या
जळगाव ९३
अहमदनगर ४३
धुळे २८
नाशिक ०७
नंदुरबार ०३
पुणे विभागात १६ शेतकरी आत्महत्या
सोलापूर १३
सातारा ०२
सांगली ०१
(पुणे आणि कोल्हापूर शून्य शेतकरी आत्महत्या)
कोकण विभागात शेतकरी आत्महत्या नाही
सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या जून महिन्यात
- जानेवारी २२६
- फेब्रुवारी १९२
- मार्च २२६
- एप्रिल २२५
- मे २२४
- जून २३३
- जुलै २२९