breaking-newsराष्ट्रिय

#Coronolockdown:नर्मदेचे पाणी 25 वर्षांत पहिल्यांदाच सर्वात जास्त शुद्ध

ओंकारेश्वर – लाॅकडाऊनमुळे देशभरातील उद्याेग बंद आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर दिसू लागला आहे. गंगा, यमुना आणि नर्मदासह अनेक नद्यांचे पाणी देखील स्वच्छ हाेऊ लागले आहे. एक महिना अगाेदर अनेक भागात अत्यंत गढूळ असे दिसणारे नर्मदेचे पाणी या दिवसात मिनरल पाण्यासारखे नितळ दिसत आहे. नर्मदा प्रदूषण नियंत्रण महामंडळ आेंकारेश्वरचे (म.प्र.) व्यवस्थापक एस.के. व्यास म्हणाले, नर्मदा नदीचे पाणी मानकाप्रमाणे मिनरल पाण्यासारखे झाले आहे.


आमच्या विभागाने त्याची तपासणी देखील केली आहे. नर्मदेच्या पाण्यात अनेक प्रकारच्या आैषधी वनस्पतीही असतात. त्यामुळे पाण्याची राेग प्रतिकारक शक्ती वाढते. तीर्थनगरीतील वेदमाता गायत्री मंदिराचे वरिष्ठ आचार्य सुभाष महाराज म्हणाले, २५ वर्षांपूर्वी आेंकारेश्वरमधील पाणी अशाच प्रकारे शुद्ध हाेते. आेंकारेश्वरला लाखाे भाविक भेट देत असतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button