breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
Coronavirus : होळीला सावध रहा – उद्धव ठाकरेंचे आवाहन
मुंबई | राज्य सरकार आणि महापालिका हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या असून आपल्याला फक्त पुढचे 10 ते 15 दिवसच काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार होलिकोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीमध्ये तपासणीसाठी रांगा लागल्या आहेत. तर एका संक्रमित रुग्णाच्या बाजुला बसून विमान प्रवास करणाऱ्या नागपूरच्या प्रवाशाला आरोग्य यंत्रणेने देखरेखीखाली ठेवले आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात होळीचा सण साजरा केला जाणार आहे. सण साजरा करा पण मोठ्या प्रमाणावर नको, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.