#CoronaVirus: सुरक्षा रक्षकांसह माथाडी कामगारांना 50 लाखांचे विमा संरक्षण, अत्यावश्यक सेवेत समावेश, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई: कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेतील घटकात समावेश करण्यात येणार आहे. तसेच ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही 50 लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच दिले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. लवकरच याबाबतचा निर्णयही जारी केला जाईल, असेही ते म्हणाले आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून देखिल त्यांना रेल्वेतून प्रवास करता येईल.
आज, मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व 'कोरोना' संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश दिले. pic.twitter.com/oGD6iPD5g4
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 28, 2020