breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

#CoronaVirus: सुरक्षा रक्षकांसह माथाडी कामगारांना 50 लाखांचे विमा संरक्षण, अत्यावश्यक सेवेत समावेश, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेतील घटकात समावेश करण्यात येणार आहे. तसेच ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही 50 लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच दिले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. लवकरच याबाबतचा निर्णयही जारी केला जाईल, असेही ते म्हणाले आहेत.

या निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून देखिल त्यांना रेल्वेतून प्रवास करता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button