#CoronaVirus : Maharashtra LockDown ! संपूर्ण राज्यात आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू : मुख्यमंत्री
मुंबई | महाराष्ट्रात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाइलाजाने राज्यात नाइलाजाने कलम 144 लागू केली जात आहे. केवळ मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड नव्हे तर सर्वच नागरी भागांमध्ये ही संचारबंदी लागू राहील. मध्यरात्रीपासून कुणीही दुसऱ्या देशातून आपल्या देशात येणार नाही.
परदेशी फ्लाइटला देशात उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे, विनाकरण गर्दी करू नका. टोळक्यांमध्ये फिरू नका. 31 मार्च पर्यंत राज्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. यापुढे गरज पडल्यास आणखी त्यामध्ये वाढ करण्यात येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. यात जीवनावश्यक सेवा आणि वस्तूंना सूट दिली जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांचे ठळक मुद्द
संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन
शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम करा
फक्त 5 टक्के कर्मचारी बाहेर काम करतील. 5 टक्के कर्मचारी संपूर्ण राज्याचा भार वाहतील
किमान पुढच्या 31 मार्चपर्यंत या नियमांचं पालन करा
जनता कर्फ्यू उद्या पहाटेपर्यंत राहणार
31 मार्चपर्यंत खासगी बस, एसटी, रेल्वे बंद राहणार
बस सेवा फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू
या रोगाने कोणाचाही माग सोडला नाही. सगळ्या देशाला या रोगाने वेढलं आहे.
त्यामुळे कोणी माणूसकी सोडू नका
पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नका
अन्नसाठा आणि महत्त्वाची दुकानं उघडी राहतील. त्यामुळे घरात साठा करून ठेवण्याची गरज नाही
घरकामांना किमान वेतन सुरू ठेवा
परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत
सगळ्यांनी एकत्र येत सामना करूया
कंपन्यांनी कामगारांना किमान वेतन द्दावं
या रोगाने कोणाचाही माग सोडला नाही. सगळ्या देशाला या रोगाने वेढलं आहे.
त्यामुळे कोणी माणूसकी सोडू नका
मुंबई लोकल पूर्णपणे बंद