breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 2801 वर पोहोचली

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि भारतात सध्याची स्थिती पाहता देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 11,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 350 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 2801 वर पोहोचली आहे. बुधवारी ( 15 एप्रिल) राज्यात 117 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील तब्बल 66 नव्या रुग्णाचा समावेश आहे. तर पुण्यातही कोरोनाचे आणखी 44 पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती मिळत आहे.

आज मुंबईत 66, ठाण्यात 3, वसई-विरार आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एक, मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेतही वाढ झाली आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button