breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus: मरकजला गेलेल्यांनी ताबडतोब संपर्क करा, अन्यथा कठोर कारवाई – मुंबई महापालिकेचा इशारा

राजधानी दिल्लीला तबलिगी मकरजला जे गेले होते, त्यांनी ताबडतोब मुंबई महापालिकेशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपल्या प्रवासाची माहिती द्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. जे कुणी असं करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.

तबलिगी मकरजला गेलेल्या लोकांमुळे मुंबई आणि राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढल्याचं चित्र समोर आले आहे. एकट्या मुंबईतील करोनाग्रस्तांचा आकडा पाचशेच्या जवळ गेला आहे. दिवसांगणिक ही आकडेवारी वाढतच आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका करोनाग्रस्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपाचर करत आहे. मरकज येथे गेलेल्या नागरिकांमुळे इतरांना करोना व्हायरस होऊ नये या उद्देशानं बीएमसीनं ट्विट करत माहिती देण्याचं आवाहन केले आहे. जर प्रवासाची माहिती दिली नाही तर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही पालिकेनं स्पष्ट केले आहे. करोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी रूग्णांची अथवा रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती मिळवून त्यांना विलगीकरण कक्षात अथवा आयसोलेशनमध्ये ठेवणं हा एकमेव उपाय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button