breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#CoronaVirus: मजुरांना उद्योग सुरू झाल्यानंतर पुन्हा शहरांमध्ये परतण्यासाठी मदत करणार- सीतारामन
लॉकडाउनमुळं सध्या देशभरातील सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झालेले आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूर आणि कामगारांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. दरम्यान, लॉकडाउननंतर पुन्हा एकदा उद्योंगाची गाडी रुळावर आल्यानंतर याच स्थलांतरित कामगारांना पुन्हा संबंधित शहरांमध्ये कामावर रुजू व्हायचे असेल तर त्यांना केंद्र सरकार मदत करेल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सीतारामन बोलत होत्या.