#CoronaVirus: भारतात प्रदीर्घकाळ निर्बंध लागू करणे अवघड
भारतात आता उन्हाळा सुरू होत आहे, त्यामुळे विषाणूंची संख्या कमी होऊ शकते; पण हा विषाणू बराच काळ राहणार आहे. त्यामुळे संसर्ग कमी करण्यासाठी प्रदीर्घ काळ देश बंद ठेवणे परवडणारे नाही, असे मत अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेचे माजी संचालक डॉ. मार्क अॅलेन विडोसन यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी सांगितले की, सध्या जगातील एक पंचमांश लोक र्निबधाखाली आहेत. त्यात भारताचाही समावेश आहे. पण संपूर्ण देशभरात टाळेबंदी लागू करण्याच्या या उपायांचा परिणाम वेगवेगळ्या भागात वेगवेगळा होईल. समशीतोष्ण प्रदेशात विषाणूचा प्रसार आणखी काही महिने वेगात होईल. उष्णकटीबंधीय देशात तो वर्षभर होईल, युरोपात बरेच देश बंद आहेत. त्यात उन्हाळ्यापर्यंत संसर्ग कमी करण्याचा हेतू आहे. भारतात हा विषाणू वर्षभर राहण्याची शक्यता असल्याने किती काळ देश बंद ठेवणार हा प्रश्न आहे.