breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: “ते १५ लाख एकत्र करुन हे पॅकेज बनवलं”; अनुराग कश्यपचा मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यावरुन दिग्दर्शक अनुराग कश्यप याने मोदींवर टीका केली आहे. “देशवासीयांसाठी जमा केलेले ते १५ लाख रुपये जोडून या पॅकेजची घोषणा केली.” असा टोला अनुरागने लगावला आहे.

काय म्हणाला अनुराग?

“मोदीजी जे १५ लाख रुपये देशवासीयांच्या खात्यात टाकणार होते त्या पैशांना जोडून हे पॅकेज तयार केलं आहे. खरं तर हे पैसे गेल्या सहा वर्षांपासून आजच्या दिवसासाठीच वाचवून ठेवले होते. आता हे पॅकेज आणखी वाढवले जाईल. पाहता पाहता आपण पाच अब्जांपर्यंत पोहोचू. याला म्हणतात दूरदर्शीपणा.” अशा आशयाचं ट्विट अनुरागने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button