#CoronaVirus: चिंताजनक! देशात १८२३ नवे कोरोना रुग्ण, २४ तासात ६७ मृत्यू
देशभरात १८२३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ६१० झाली आहे. यापैकी ८ हजार २७३ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन १ हजार ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
1823 new cases and 67 deaths reported in the last 24 hours
— ANI (@ANI) April 30, 2020
The total number of COVID19 positive cases in India rises to 33610 including 24162 active cases, 8373 cured, discharged, migrated and 1075 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/G0RbjT1ONT
देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला. यापुढे काय उपाय योजना करायच्या तेदेखील स्पष्ट होईल. तूर्तास भारतात रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. २७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये त्यांनी देशातील सर्व राज्यांचा आढावा घेतला. दो गज की दूरी चं महत्त्व त्यांनी या बैठकीत विषद केलं. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत सहा राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची विनंती केली आहे.
लॉकडाउन वाढणार की नाही याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतील. देशातले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाईल अशी शक्यता आहे. आता नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान देशातल्या करोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ६१० झाली आहे. तर २४ तासात ६७ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला.