breaking-newsमहाराष्ट्र

#CoronaVirus:लातूरमध्ये क्वारंटाईन होण्यावरुन वाद, दोघांची हत्या

लातूर : लातूर जिल्ह्यात क्वारंटाईन होण्यावरुन वाद झाल्याने दोघांची हत्या करण्यात आली आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे घडली. या घनटेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विद्यामान बरमदे सह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी विद्यमान हा उत्तर प्रदेशहून प्रवास करुन लातूरमध्ये आला होता. त्यामुळे गावातील शहाजी पाटील, वैभव पाटील यांनी तुम्ही प्रवास करुन आलेला आहात, तर तुमचा ट्रक गावाबाहेर लावा आणि तुम्ही शेतात क्वारंटाईन व्हा, असे सांगितले. असे सांगितल्याने आरोपी विद्यामानला राग आला. यामुळे विद्यामान आणि शहाजी, वैभव पाटील यांच्यात वाद निर्माण झाला.

यानंतर विद्यमानने मध्यरात्री आपल्या नातेवाईकांसह शहाजी पाटील यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात शहाजी पाटील आणि वैभव पाटील यांची हत्या करण्यात आली. तर शत्रुघन पाटील गंभीररित्या जखमी झाले आहेत.

आरोपीचा विद्यमान बरमदे हे मुंबईत राहतात. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. पोलिसांनी आरोपीसह सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button