breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबई

Corona virus : कोरोना विषाणूबाबत घाबरून जाण्याची गरज नाही : आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणू संसर्गामुळे घाबरण्याची गरज नाही. अद्याप राज्यात कोरोना विषाणूचा पॉझिटिव्ह एकही रुग्ण नाही. सहा संशयितांमध्ये केवळ लक्षणे जाणवली आहेत. राज्यात आलेल्या ५५० विमानांपैकी २५०० प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची कसूर होणार नाही याची काळजी घेतली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

विधान परिषदेत नियम ९३ अन्वये कोरोना विषाणूसंदर्भात अल्पकालीन चर्चा झाली. मात्र या विषयाचं गांभीर्य पाहता ही चर्चा दीर्घकाळ चालली. अनेक सन्माननीय सदस्यांनी या विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात चिंता व्यक्त केली व काही सूचना केल्या.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत खूप चांगल्या पद्धतीने या चर्चेला उत्तर दिले. सर्वसामान्यांमधील वेगवेगळ्या अर्धवट समजुती व अफवांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांचं हे निवेदन खूप दिलासा देणारं आहे. हे निवेधन या व्हिडियोद्वारे सगळ्यांना समजून घेता येईल. एवढंच नाही तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय विशेष काळजी घ्यावी याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button