breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

#CMLIVE | मुंबई, ठाणे, पुणे वगळता लॉकडाऊन शिथिल होणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं संबोधन सुरू झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्वाच्या  विषयावर बोलणार असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. राज्यातील करोनाबाधितांमध्ये गुरुवारी ५८३ नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या आता साडेदहा हजारांवर गेली आहे. यापैकी १७७३ रुग्ण बरे झाले असून त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित केले त्यातील महत्वाचे मुद्दे….

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा…

रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांमुळं लॉकडाऊन असूनही आकडे वाढताहेत – मुख्यमंत्री

लॉकडाऊन म्हणजे टाळेबंदी नाही. हा गतिरोधक आहे. विषाणूची साखळी तोडण्यासाठी हा गतिरोधक आहे – मुख्यमंत्री

महाराष्ट्रानं ठरवलं तर सर्व काही करू शकतो. लढू शकतो. आजही करोनाविरुद्ध लढतोच आहे – मुख्यमंत्री

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नागपूरच्या काही भागात काही सुरू करणं हे हिताचं नाही – मुख्यमंत्री

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर झुंबड उडाली तर पुन्हा निर्बंध लादले जातील – मुख्यमंत्री

राज्यातल्या राज्यात लोकांच्या स्थलांतराचा विचार केला जाईल – मुख्यमंत्री

केवळ रुग्णांसाठी बेड वाढवतोय असं नाही तर आरोग्य सेवकांची संख्याही वाढवत आहोत – मुख्यमंत्री

ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये कारभार सुरू करण्यासाठी आपला विचार सुरू आहे – मुख्यमंत्री

कुठल्याही राज्याची आणि देशाची संपत्ती ही तिथले नागरिक असतात. ती वाचली तर सर्व संकटांवर मात करता येईल – मुख्यमंत्री

मुंबई व कल्याण-डोंबिवलीच्या महापौरांनी परिचारिका म्हणून सेवा देण्याची तयारी दाखवलीय – मुख्यमंत्री

ग्रीन झोनमध्ये यापूर्वीच आपण काही सवलती दिल्या आहेत – मुख्यमंत्री

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button