शबरीमला मंदिरात अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी केरळ सरकारची-तृप्ती देसाई
मुंबई – केरळमधील शबरीमला मंदिरात आपण प्रवेश करणार आहोत. सुरक्षेसंदर्भात मी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्रही लिहिले आहे. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. आता कोणताही गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडला तर आमची जबाबदारी नसेल असे आता तृप्ती देसाईंनी म्हटले आहे. शबरीमला मंदिरात तृप्ती देसाई प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ नोव्हेंबरला त्या या मंदिरात जाणार आहेत. मंदिरात प्रवेश करताना आम्हाला सुरक्षा पुरवा असे पत्र तृप्ती देसाई यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना लिहिले आहे.
I have not received any response from the Kerala government. If any incident occurs, its responsibility will be on Kerala CM and DGP: Trupti Desai, founder of the Bhumata Brigade. She had written to Kerala CM seeking security for her visit to #SabrimalaTemple on 17 November pic.twitter.com/lB54OeU7AS
— ANI (@ANI) November 15, 2018
पी. विजयन यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे आता कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी केरळ सरकारची असेल आमची नाही असा इशाराच तृप्ती देसाईंनी दिला आहे. तृप्ती देसाई या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता त्यावरून बराच वाद रंगला होता.