‘लिव्ह ईन रिलेशनऐवजी रितसर लग्न करा’; चित्रा वाघ यांचा सल्ला
मुंबई : मनोज साने याने त्याची लिव्ह ईन पार्टनर सरस्वती वैद्य हिची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. दरम्यान, लिव्ह ईन रिलेशन बाबत भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोठं विधान केलं आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, ऋद्धा वालकर प्रकरण आणि आता सरस्वती वैद्यचे प्रकरण समोर आल्यामुळे लिव्ह ईन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलांचीच पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे. या संबंधामुळे महिला कुटुंबापासून दुरावते आणि तिचा कुठलाच थांगपत्ता तिचा कुटुंबीयांना नसतो. त्यामुळे मुलींनी लिव्ह ईनमध्ये राहण्याऐवजी आई-वडिलांच्या पसंतीने रीतसर लग्न करावे.
हेही वाचा – ITI Admission 2023 : आयटीआय प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपासून सुरू होणार..
मनोज साने याने केलेले कृत्य हे अत्यंत क्रूर असून अशा अघोरी व्यक्तीला फाशीचीच शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करणार आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.