Uncategorized

बाबा रामदेव यांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, आम्ही जर हत्यारं उचलली असती, तर..

हिंदूधर्म केवळ राष्ट्रधर्म नाही, तर हिंदुधर्म विश्वधर्म एक युगधर्म आहे

जळगाव : जामनेर तालुक्यातील गोद्री येथे हिंदू गोर बंजारा-लबाना-नायकडा समाज कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी बाबा रामदेव यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी बोलताना आम्ही जर हत्यारं उचलली असती, तर आज इथे एक सुद्धा मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिला नसता, असं वादग्रस्त विधान योगगुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे. बाबा रामदेव यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आम्ही जर भेदभाव केला असता, तर ख्रिश्चन धर्मीय इथे एकही पाऊल पुढे टाकू शकला नसता. भारतातील एकही व्यक्ती आपल्या इच्छेने मुस्लिम बनला नाही, तर त्याला जबरदस्तीने मुस्लिम बनवले गेले आहे. आता त्यांना आपल्या धर्मात घेण्याची गरज आहे. आपसातील सर्व भेदभाव विसरून समस्त हिंदू समाजाने एकजूट होण्याची गरज आहे. जर आम्ही हत्यार उचलले असते, तर इथे एकही मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिला नसता, असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे.

हिंदूधर्म केवळ राष्ट्रधर्म नाही, तर हिंदुधर्म विश्वधर्म एक युगधर्म आहे. सनातन म्हणजे नित्य, शास्वत धर्म आहे. त्याला कुठलिही शक्ती मिटवू शकत नाही. ज्याप्रमाणे कुणी अग्नी, जल, वायु आणि पृथ्वीचा धर्म बदलू शकत नाही, त्याप्रमाणे कुणीही हिंदूधर्म बदलू शकत नाही हे शास्वत सत्य आहे.

दरम्यान, या कुंभात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्या प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात आदी राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button