तळवडे येथील आगीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईलःपालकमंत्री अजित पवार
महापालिकेच्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागलीय
मुंबईः तळवडे येथील फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. कंपन्यांच्या ऑडिटकडे महापालिका प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असून तळवडेतील आगीप्रकरणी जबाबदार धरून महापालिकेच्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागलीयअशी मागणी जोर धरू लागली असताना उपमुख्यंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात तळवडे येथील आगीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,असे एक्स पोस्टवर म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील फायर कँडल बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींवर उपचार…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 8, 2023
या बाबत ट्विट द्वारे अजित पवार यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील फायर कँडल बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींवर उपचार सुरु असून त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल अशी प्रार्थना करतो.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पूर्ण उपाययोजना केल्या जातील.