breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
उत्तर प्रदेश ; एन्काउंटरच्या नावाखाली सर्वाधिक दलित-मुस्लिमांच्या हत्या
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात एन्काउंटरच्या नावाखाली खून केले जात असून त्यात मरणाऱ्यांमध्ये दलित आणि मुस्लिम समाजातील लोक सर्वाधिक आहेत, असा धक्कादायक दावा मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही या संस्थेने केली आहे.
‘सिटीजन अगेन्स्ट हेट’ या संस्थेने हा दावा केला असून तसा अहवालही त्यांनी तयार केला आहे. उत्तर प्रदेशात १६ आणि मेवात परिसरात झालेल्या १२ एन्काउंटरची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. २०१७-२०१८ मध्ये हे एन्काउंटर झाले होते. सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण यांनी हे एन्काउंटर नसून खून असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेशात त्यांची स्वतंत्र टीम पाठवून या प्रकरणाची चौकशी करावी, असे ही भूषण यांनी म्हटलं आहे.