Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

असा नाश्ता ज्यामुळे तुम्हाला कधीच भासणार नाही, डॉक्टरांची गरज, जाणून घ्या कोणते आहे ‘ते’ पदार्थ

Health : सकाळच्या धावपळीमुळे अनेक जण सकाळचा नाश्ता करत नाहीत, पण ही फार चुकीची गोष्ट आहे… यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या समोर येतातं. अनेक जण तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्षच देत नाही. घरातील जबाबदारी, ऑफिसमधील कामाचा लोड यांसारख्या अनेक गोष्टींमुळे देखील अनेक समस्या डोकं वर काढतात. म्हणून सकाळचा नाश्ता अत्यंत गरजेचा आहे… पण काही जण असे देखील आहेत जे, सकाळचा नाश्ता करतच नाही. अशात असे कही पदार्थ आहेत, ज्यामुळे तुम्हाला कधीच डॉक्टरांची गरज भासणार नाही.. तार जाणू घ्या कोणते आहेत ते पदार्थ…

पुरी आणि वडे, जे अनेकांना सकाळी खायला आवडतात, त्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. एक प्लेट पुरी किंवा वडा खाल्ल्याने शरीराला सुमारे 6000 ते 800 अतिरिक्त कॅलरीज मिळतात. यामुळे जिभेला चव आणि मनाला समाधान मिळते, पण त्यामुळे वजन वाढते आणि पोटाचे विकार होतात. हे देखील लक्षात ठेवा.

निरोगी आयुष्यासाठी, नाश्ता संतुलित असावा. त्यात केवळ कर्बोदकेच नव्हे, तर शरीराला आवश्यक असलेली प्रथिने, फायबर आणि चांगले फॅट्स यांचाही समावेश असावा. इडली किंवा डोसासोबत भाज्या आणि कडधान्यांचा सांबार घेतल्यास संपूर्ण पोषक तत्वे मिळतात.

हेही वाचा –  नाव बदललं, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली अन्…; सलमान खानच्या ‘मातृभूमी’ सिनेमाचे होतंय पुन्हा शूटिंग?

सकाळी ब्रेड, जॅम किंवा पीठ खाल्ल्याने, ज्यात योग्य पोषक तत्वे नसतात आणि निरुपयोगी कॅलरीज असतात, शरीरातील इन्सुलिन प्रतिरोध वाढतो. बाहेरून जरी हे केवळ वजन वाढल्यासारखे दिसत असले तरी, वैद्यकीय तज्ज्ञ चेतावणी देतात की याचा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर अंतर्गत गंभीर परिणाम होतो.

पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी प्रोबायोटिक्स आवश्यक आहेत. नाश्त्यानंतर किंवा दुपारी एक ग्लास साधे ताक प्यायल्याने शरीराला आवश्यक असलेले चांगले बॅक्टेरिया मिळतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि ऊर्जा मिळते.

बरेच लोक आरोग्याच्या कारणास्तव सकाळी फळांचा रस पितात, पण ही एक चुकीची सवय आहे. फळांचा रस काढल्यावर त्यातील फायबर पूर्णपणे निघून जाते आणि फक्त साखर शिल्लक राहते. त्यामुळे, फळे रसाच्या स्वरूपात न खाता, त्यांचे तुकडे करून चावून खाणे नेहमीच चांगले असते. पण कोणतेही नवीन बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button