दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा मनसेला डिवचलं; म्हणाल्या..
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रस्त्यांतील खड्ड्यांवरून आक्रमक झाले आहेत. मनसैनिकांकडून अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. दरम्यान, यावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा एकदा डिवचलं आहे.
दीपाली सय्यद म्हणाल्या, मनसेच्या जागर यात्राने भविष्यात शॅडो मंत्रीपद वाढेल पन यात्रेतरस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम घेतली तर एकाचे दोन आमदार होतील आणि युवा नेते शॅडो मंत्री बनतील, यात्रेत राष्ट्राच्या संपतीचे नुकसान नको, देशपांडेना (संदीप देशपांडे) अजुनही डॅाक्टरची गरज आहे, ते लवकरच बरे होतील, कोणी व्हिल चेअर मागवा रे!, असं ट्वीट दीपाली सय्यद यांनी केलं आहे.
हेही वाचा – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आमदार महेश लांडगे यांची ‘फराळ सेवा’
मनचेच्या जागर यात्राने भविष्यात शॅडो मंत्रीपद वाढेल पन यात्रेतरस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम घेतलीतर एकाचे दोन आमदार होतीलआणि युवा नेते शॅडो मंत्री बनतील,यात्रेत राष्ट्राच्या संपतीचे नुकसान नको,देशपांडेना अजुनही डॅाक्टरची गरज आहे,ते लवकरच बरे होतील,कोणी व्हिल चेअर मागवा रे!
— Deepali Sayed (@deepalisayed) August 21, 2023
दरम्यान, यापूर्वीही दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं होतं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी. राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत, तेवढेच रस्त्यावर खड्डे आहेत, असा टोला दीपाली सय्यद यांनी मनसेला लगावला होता.