Rain : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार, पुन्हा एकदा पावसाचे संकेत
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस नाही. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. मात्र सातारा, सांगली, नगर, औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, अकोला, जळगाव या जिल्ह्यात अजून पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, राज्यात १५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. कोकण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार, तसेच विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. १५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार असून मान्सूनच्या नवीन पद्धतीनुसार राज्यात कमी वेळेत अधिक पावसाच्या सरी बरसणार आहेत.
हेही वाचा – पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी शिंदे सरकारची मोठी खेळी! जाहीर केली ‘ही’ यादी
चार ऑगस्टपर्यंत राज्यात तूरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, चार ऑगस्टपासून तर नऊ ऑगस्टपर्यंत बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. राज्यात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत आहे, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.