‘भाकरी एकाची, चाकरी दुसऱ्याची..हा राऊतांचा सध्याचा फॉर्म्युला’; भाजपची खोचक टीका
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि शिंदे गटावर सातत्याने टीका केली जात आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ईडीने अनेकांच्या बाबतीत हे घडवले आहे असं सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे. दरम्यान, यावरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत राऊतांबर हल्लाबोल केला आहे. भाकरी एकाची आणि चाकरी दुसऱ्याची..हा संजय राऊत यांचा सध्याचा फॉर्म्युला आहे..सामनाची अवस्था संजय राऊतांनी त्यांच्या वक्तव्यांसारखीच म्हणजेच फेक न्यूज फॅक्टररीसारखी करून ठेवली आहे.
हेही वाचा – ना पंतप्रधान, ना राष्ट्रपती..नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी ओवैसींनी सुचवलं हे नाव
तारतम्य सोडून काहीही बोलायचं हा संजय राऊतांचा हल्लीचा छंद आहे, तसे लिखानही सामनामधूम होत आहे.. भारतीय जनता पार्टीने जयंत पाटलांना कोणताही प्रस्ताव देण्याचा काही संबंधही नाही. केवळ चौकशीच्या मुख्य मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी हा खोटा दावा केला जातोय..संजय राऊत आधी पवार साहेबांचे प्रवक्ते होते..ते आता जयंत पाटलांनाही डिपेंड करताहेत..याचाच अर्थ आता राऊत राष्ट्रवादीचे अधिकृत प्रवक्ते झाले आहे, असं केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.